लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Sunday 3 April 2016

आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात आंदोलने



आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात हि काल टेंभू योजनेचे पाणी मिळावे म्हणून आंदोलने
पहिल्यांदा कडेगाव … 
येथील ल. पा. तलावात टेंभू चे पाणी सोडावे अशी लोकांची मागणी होती , सध्या या तलावात पाणी सोडण्याचे कसलेही नियोजन नसताना देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कडून चालू वर्षीच्या ऊस बिलातून या आवर्तनाचे पैसे कपात करून घेतले आहेत . पाणी पट्टी भरूनही आम्हाला पाणी का दिले जात नाही असा सवाल शेतकरी विचारत आहेत. आंदोलन झाल्या नंतर जल संपदा विभागाचे शाखा अभियंता दीपक निर्मळे  यांनी  सध्या कामथी (ता कराड) कालव्याचे रोटेशन सुरु आहे त्यानंतर गुढी पाडव्याला तुम्हाला पाणी देण्यात येईल असे उत्तर दिले आहे …. 
कडेगाव तालुक्याने टेंभू च्या पाण्याचा आतापर्यंत चिक्कार लाभ अगदी फुकट घेतला आहे , आताही केवळ दांड पणा करून माझे ते माझेच आणि दुसर्याचे ते हि माझेच असे धोरण सुरु ठेवले आहे … यां तालुक्याला सर्वात जास्त पाणी मिळाले आहे , पारंपारिक पिक पद्धती सोडून या तालुक्याने केवळ ऊस शेती सुरु केल्याने अमाप पाणी लागते. त्या मुळे सतत पाणी असूनही पाणी नाही म्हणून इथलेच  लोक बोंब ठोकतात …. पुढे पाणी चालले कि या मंडळींच्या पोटात दुखते कि काय कोणास ठाऊक ? आणि सर्वात कडी म्हणजे इथे सगळ्याच पक्ष्याचे सगळेच राजकीय पुढारी  पाणी पळवण्यात पटाईत आहेत असे एकूण चित्र आहे. 
आता आटपाडी च्या आंदोलनाविषयी -
श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन लॉंग मार्च नावाने आटपाडी ते कराड असे झाले…सांगोला , आटपाडी या शेपटा कडच्या भागा  अगोदर  खानापूर तालुक्यात भाग्य नगर तलाव आणि करंज ओढ्याला पाणी का सोडले ? असा जाब म्हणे मोर्चे करांनी कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे याना विचारला … खानापूर तालुक्याला दिलेले पाणी हा चोरीचा प्रकार आहे असे त्यांचे मत होते …. हे म्हणजे अति झाले … खानापूर तालुक्याला पाणी दिले ते हि फुकटात दिलेले नाही कोणीतरी (पैसे कोणी भरले त्यांची नावे पुढच्या वेळी नक्कीच जाहीर केली जातील ) पाणी पट्टी आधीच भरली नंतरच पाणी आलेले आहे … ते पाणी चाचणी साठी म्हणून करंज ओढ्यात सोडले आहे. भाग्यनगर चे आवर्तन नियम प्रमाणेच आहे… आणि हाच निकष लावायचा तर दोन वर्षांच्या पूर्वी आटपाडीत आलेले पाणी सुद्धां असेच नियम मोडून आले होते . तेंव्हा या  मंडळींनी उगाच आटपाडी करांना भूल थापा देवू नये. 

  टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , घडामोड , सर्वात आधी , 
अगदी निर्भीड, नि : ष्पक्ष …. सडेतोड वृत्ते, विश्लेषण आणि अभ्यास पूर्ण माहिती …
राहा अपडेट माझ्या बरोबर … पत्रकार विजय लाळे. 
फेसबुक पेज आणि ब्लॉग 

चितळी जवळ टेंभू चे दारच उखडले !

चितळी जवळ टेंभू चे दारच उखडले !


दैनिक पुढारी , ३/०३/२०१६

टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , घडामोड , सर्वात आधी 

अगदी निर्भीड, नि : ष्पक्ष …. सडेतोड वृत्ते, विश्लेषण 

णि अभ्यास पूर्ण माहिती …

फेसबुक पेज Failure Of Tembhu Water Lifting 

Scheme https://www.facebook.com/Failure-

Of-Tembhu-Water-Lifting-Scheme-

570277833114360/info/?tab=page_info

आणि 

ब्लॉग http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

राहा अपडेट माझ्या बरोबर … पत्रकार विजय लाळे.